शैक्षणिक अपडेट : राज्य परीक्षा परिषदेकडून आता अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षेची जबाबदारी काढण्यात आली आहे . त्यामुळे परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार नसून आता एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे . राज्यात शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी फेब्रुवारीमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले होते . दरम्यान परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाइन हेदेखील लवकरच ठरणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे .
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी फेब्रुवारीमध्ये घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. या नुसार फेब्रुवारी 2022 मध्ये तसेच यंदा ही परीक्षा ऑफलाइन २०० गुणांची घेण्याचेदेखील निश्चित झाले होते . परंतु शिक्षक पात्रता परिषद अर्थात टीईटी परीक्षेत राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनीच गैरव्यवहार केल्याचे उघड झाले . त्यामुळे राज्य शासनाने अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा घेण्याची जबादारी काढली आहे.
अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आता राज्य परीक्षा परिषद घेणार नाही . संबंधित परीक्षा घेण्यासंदर्भात टीसीएस , आयबीपीएस आणि एमकेसीएल कंपन्यांचे सादरीकरण होणार आहे . या सादरीकरणानंतरच परीक्षा ऑनलाइन घ्यायची की ऑफलाइन हे निश्चित केले जाईल . परंतु आता ही परीक्षा फेब्रुवारीऐवजी एप्रिलमध्ये घेण्याचा आमचा प्रयत्न आहे .
- विशाल सोळंकी , शिक्षण आयुक्त
परीक्षेतील पात्रता गैरव्यवहाराचा फटका दुसऱ्या TAIT परीक्षेला!
राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या खासगी , अनुदानित , विनाअनुदानित , अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांमधील शिक्षणसेवकांची भरती अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला आहे . त्यासाठी पवित्र पोर्टल तयार करण्यात आले .परंतु डिसेंबर २०१७ नंतर राज्यात पुन्हा कधीही संबंधित परीक्षा घेण्यात आलेली नाही .आता फेब्रुवारी मध्ये होणारी परीक्षेलाही परीक्षामधील गैरव्यवहाराचा फटका बसला आहे.
Post a Comment